🙏 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांवर आधारित या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत! तुकोबारायांच्या अभंगांमध्ये भक्ती, परमार्थ, समाजप्रबोधन आणि आत्मानुभूती यांचे अद्वितीय संमेलन आहे. त्यांच्या ओव्या केवळ धार्मिक उपदेश नसून त्या आपल्या जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरतात. या ब्लॉगमध्ये आम्ही तुकाराम महाराजांचे निवडक अभंग, त्यांचे भावार्थ आणि कालसुसंगत अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांनी केवळ अभंग वाचू नयेत, तर अनुभवावा – हा आमचा नम्र प्रयत्न आहे.. . . 🙏 धन्यवाद - गजानन रा. माने .

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

पश्चात्तापाच्या उंबरठ्यावर उभं आयुष्य…

काही वर्षांपूर्वी मी एक कथा-कादंबरी वाचली होती. नाव आज आठवत नाही, पण तिचा मतितार्थ आजही मनात ठसठसतो आहे. ती कथा एका नर्सने सांगितलेली होती—ज्या दवाखान्यातील एका वॉर्डमध्ये शेवटच्या अवस्थेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत होती. काही दिवसांचे पाहुणे, काही तासांचे, तर काही क्षणांचे… अशा लोकांच्या अगदी जवळून तिने मृत्यू पाहिला होता. ती कथा सत्य घटनेवर आधारित होती. त्या नर्सने एक फार बोलकं सत्य मांडलं होतं— माणूस शेवटी पश्चात्ताप करतो. “मी असं करायला नको होतं…” “मी याच्याशी चुकीचं वागलो…” “मी खोटे आरोप केले…” “माझ्या अहंकारापायी नातं तुटलं…” मरण समोर उभं असताना, संपत्ती आठवत नाही, पद आठवत नाही, सत्ता आठवत नाही… आठवतो तो फक्त आपला अन्याय, आपली चूक, आणि न बोललेली माफी. आणि हे वाचताना एक प्रश्न मनाला बोचतो— आपण आज कुठल्या दिशेने चाललो आहोत? चूक दिसते, पण आपण तिला चूक म्हणत नाही. एखादी चुकीची गोष्ट घडते, पण “मला काय त्याचं” म्हणून दुर्लक्ष करतो. पैशासाठी मतदान करतो. “हा आपल्या पक्षाचा आहे” किंवा “हा आपल्या गटाचा आहे” म्हणून त्याच्या चुकीवर पांघरूण घालतो. अशा कितीतरी गोष्टी आपण रोज सहजपणे करत राहतो… पण थांबून कधी विचार करत नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे— आपण या जगाचे मालक नाही. तर काही दिवस काही वर्षे यासाठी येथे आलेले आपण इथे पाहुणे आहोत. आज नाही तर उद्या, कधी ना कधी… आपल्यालाही जायचंच आहे. मग जाताना, डोळे मिटताना, मनात पश्चात्तापाची जळजळ उरू नये— असं आयुष्य जगणं, असं वागणं, असं अनुकरण ठेवणं… हेच खरं यश आहे.

नका दंतकथा येथे सांगो कोणी…” : तुकाराम महाराजांचा चिकित्सक विचार

नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ।।१।। अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढे ।।२।। निवडी वेगळें क्षीर...

🧳 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांचे निवडक अभंग ब्लॉगवर आपले मानवपूर्वक स्वागत . आपल्या सूचनांचे स्वागत आहे . 🌍